IND vs AUS: रोहित-विराटचा फुसका बार! 'या' 5 चुका ठरल्या टीम इंडियाच्या पराभवाचं कारण

Manish Jadhav

टीम इंडियाचा दारुण पराभव

मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी दारुण पराभव झाला.

Team India | dainik gomantak

कांगारुंची आघाडी

पाचव्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर मालिका बरोबरीत सुटेल. चार सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे.

aus team | dainik gomantak

हिट मॅन अपयशी

चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचं नेतृत्व अपयशी ठरलं. खरं तर चौथ्या कसोटीत शुबमन गिलला वगळणं टीम इंडियाला महागात पडलं.

rohit sharma | dainik gomantak

रोहित-विराटचा फुसका बार

रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत फार काही ग्रेट करु शकले नाहीत. चौथ्या कसोटीत दोघांकडून खूप आपेक्षा होत्या. मात्र त्यांनी हिरमूड केला.

rohit-virat | dainik gomantak

फलंदाजीचा क्रम

मेलबर्न कसोटीत फलंदाजीचा क्रम बदलणं टीम इंडियाच्या अंगलट आलं. रोहित शर्मा ओपनर म्हणून अपयशी ठरला.

rohit | dainik gomantak

ऋषभची बेजबाबदार खेळी

ऋषभ पंतची बेजबाबदार खेळीही पराभवाला कारणीभूत ठरली. चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे टीम इंडियाला फटका बसला.

rishabh pant | dainik gomantak

फिरकीची जादू चालली नाही

टीम इंडिया मेलबर्न कसोटी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरली होती. फिरकीची जादू चालली नाही.

ravindra jadeja | dainik gomantak
आणखी बघा