जेव्हा इंग्लंडने 12 वर्षांपूर्वी भारतात जिंकलेली कसोटी मालिका...

Pranali Kodre

इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला असून 25 जानेवारी 2024 पासून भारतीय संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

Ben Stokes | PTI

12 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न

दरम्यान, इंग्लंड यंदा 12 वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे.

Ben Stokes | PTI

12 वर्षांपूर्वी...

12 वर्षांपूर्वी इंग्लंडने भारताला भारतीय भूमीतच 2-1 अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले होते. विशेष म्हणजे भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका पराभूत होण्याची ती अखेरची वेळ होती.

Team India | Twitter

12 वर्षे कसोटी मालिकेत अपराजीत

त्यानंतर गेली 12 वर्षे भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका पराभूत झालेला नाही. त्याचमुळे हीच अपराजीत राहण्याची मालिका काय राखण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

Team India | PTI

कसोटी मालिका

12 वर्षांपूर्वी जेव्हा इंग्लंडने भारताचा दौरा केलेला, तेव्हा 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती.

India vs England | X

पहिला सामना

या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादला भारताने 9 विकेट्सने जिंकला होता, या सामन्यात नाबाद 206 आणि नाबाद 41 धावा करणारा चेतेश्वर पुजारा सामनावीर ठरला होता.

Cheteshwar Pujara | X/cricketcomau

दुसरा सामना

त्यानंतर मुंबई कसोटी इंग्लंडने 10 विकेट्सने जिंकली होती. या सामन्यात 186 धावा करणारा केविन पीटरसन सामनावीर ठरला होता.

Kevin Pietersen | X/ICC

तिसरा सामना

कोलकाता कसोटीत इंग्लंडने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात 190 धावांची खेळी करणारा ऍलिस्टर कूक सामनावीर ठरला होता.

Alastair Cook | X/ICC

चौथा सामना

अखेरचा कसोटी सामना नागपूरला झालेला, जो अनिर्णित राहिला होता. या सामन्यात 4 विकेट्स घेणारा जेम्स अँडरसन सामनावीर ठरला होता.

Stuart Broad - James Anderson | Twitter

मालिकावीर

या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार ऍलिस्टर कूकने जिंकला होता. त्याने 4 सामन्यांत 3 शतकांसह 80 च्या सरासरीने 562 धावा ठोकल्या होत्या.

Alastair Cook | X

India vs England: कधी आणि कुठे होणार कसोटी सामने? पाहा वेळापत्रक

Team India | PTI
आणखी बघण्यासाठी