Bhuikot Forts: डोंगरकिल्ले ताकद, तर भुईकोट किल्ले स्वराज्याची 'ढाल'! छत्रपतींनी कसे बनवले 'अजिंक्य'?

Manish Jadhav

प्रशासनाची प्रमुख केंद्रे

छत्रपतींच्या स्वराज्यात डोंगरकिल्ले संरक्षणासाठी असले तरी स्वराज्यातील दैनंदिन व्यवहार, न्यायदान आणि महसूल गोळा करण्यासाठी 'भुईकोट' किल्ले प्रशासकीय मुख्यालये म्हणून वापरले जात.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

व्यापारी मार्गांचे नियंत्रण

अनेक भुईकोट किल्ले हे महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर वसलेले होते. शत्रूची ये-जा रोखण्यासाठी आणि व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी महाराज या किल्ल्यांचा उपयोग करत.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

अवाढव्य रसद साठवणूक

युद्धाच्या काळात पायदळाला आणि घोडदळाला लागणारे धान्य, दारुगोळा आणि रसद साठवण्यासाठी भुईकोट किल्ल्यांमध्ये महाराजांनी मोठी कोठारे बांधली.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

अभेद्य तटबंदी आणि खंदक

भुईकोट किल्ल्यांना नैसर्गिक उंची नसली तरी, त्यांच्याभोवती खोल खंदक (पाण्याने भरलेले) आणि अतिशय भक्कम, उंच तटबंदी बांधून त्यांना महाराजांनी अभेद्य बनवले.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

अश्वदळाचे मुख्य थांबे

डोंगराळ भागात घोडदळाच्या हालचालींवर मर्यादा येत. अशा वेळी सपाट प्रदेशातील भुईकोट किल्ले हे महाराजांच्या 'बलाढ्य घोडदळासाठी' मुख्य छावण्या म्हणून काम करत.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

शत्रूच्या हालचालींवर नजर

मैदानी प्रदेशातून येणाऱ्या शत्रूच्या फौजेला रोखण्यासाठी भुईकोट किल्ले हे 'पहिली फळी' म्हणून काम करत, ज्यामुळे डोंगरकिल्ल्यांवरील फौजेला तयारीसाठी वेळ मिळे.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

स्थानिक प्रजेचे संरक्षण

आक्रमणावेळी आजूबाजूच्या गावातील प्रजेला तात्काळ आश्रय देण्यासाठी भुईकोट किल्ल्यांचा उपयोग केला जाई. चौरस बांधणीमुळे तिथे मोठ्या संख्येने लोक राहू शकत.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

स्वराज्याची धाक

चाकण, बहादूरगड (पेठ) किंवा सोलापूर यांसारख्या भुईकोट किल्ल्यांनी बलाढ्य मुघल फौजांना अनेक महिने झुंजवत ठेवले, जे महाराजांच्या स्वराज्याच्या लष्करी शक्तीचे प्रतीक होते.

Shivaji Maharaj | Dainik Gomantak

Bhuikot Fort: इंद्रायणीच्या कुशीत विसावलेला अनमोल ठेवा! 300 वर्षांपूर्वी बांधलेला 'इंदुरी किल्ला' अध्यात्म आणि पराक्रमाचा संगम

आणखी बघा