Bhuikot Fort: इंद्रायणीच्या कुशीत विसावलेला अनमोल ठेवा! 300 वर्षांपूर्वी बांधलेला 'इंदुरी किल्ला' अध्यात्म आणि पराक्रमाचा संगम

Manish Jadhav

ऐतिहासिक निर्मिती

इंद्रायणी नदीच्या काठावर असलेला इंदुरी किल्ला 1720 ते 1721 च्या सुमारास श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी बांधला. हा एक 'भुईकोट' प्रकारचा किल्ला आहे.

Induri Fort | Dainik Gomantak

सरसेनापती दाभाडे यांचे मुख्य ठाणे

मराठा साम्राज्यात दाभाडे घराण्याचे मोठे योगदान होते. हा किल्ला दाभाडे परिवाराचे निवासस्थान आणि लष्करी हालचालींचे मुख्य केंद्र होते.

Induri Fort | Dainik Gomantak

इंद्रायणी नदीचे संरक्षण

इंदुरी किल्ला नदीच्या काठावर अशा पद्धतीने बांधला आहे की, नदीच्या पात्रातून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवणे सोपे जाई. आजही किल्ल्याच्या तटबंदीला इंद्रायणीचे पाणी स्पर्श करते.

Induri Fort | Dainik Gomantak

भव्य तटबंदी आणि बुरुज

किल्ल्याला आजही भक्कम तटबंदी असून त्यात अनेक बुरुज आहेत. या बुरुजांवरुन परिसरावर नजर ठेवली जात असे. किल्ल्याचे दगडी बांधकाम आजही त्याच्या मजबुतीची साक्ष देते.

Induri Fort | Dainik Gomantak

विठ्ठल-रखूमाई मंदिर

किल्ल्याच्या आत एक प्राचीन विठ्ठल-रखूमाईचे मंदिर आहे. हे मंदिर कोरीव कामासाठी प्रसिद्ध असून आजही स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान आहे.

Induri Fort | Dainik Gomantak

काच कारखाना

काही काळ या किल्ल्याच्या परिसरात 'पैसा फंड' काच कारखाना चालवला जात असे. ऐतिहासिक वास्तूचा वापर लोककल्याणासाठी केल्याचे हे एक उत्तम उदाहरण होते.

Induri Fort | Dainik Gomantak

तळेगाव दाभाडेचे महत्त्व

हा किल्ला पुणे-मुंबई जुन्या महामार्गाजवळ असल्याने ऐतिहासिक काळापासून या मार्गावरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. जवळील तळेगावची लढाई ही इतिहासात प्रसिद्ध आहे.

Induri Fort | Dainik Gomantak

सद्यस्थिती आणि पर्यटन

आज हा किल्ला काही प्रमाणात ढासळलेल्या अवस्थेत असला तरी इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र आहे. इंद्रायणीच्या संथ प्रवाहामुळे या किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

Induri Fort | Dainik Gomantak

Konkan Tourism: इतिहास, निसर्ग आणि ॲडव्हेंचर...! कोकणातील 'हा' सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांना घालतो साद

आणखी बघा