Akshata Chhatre
मुलांच्या मनात नेहमीच नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची ओढ असते. त्यांच्या कुतूहलाचा मूळ पाया म्हणजे जग समजून घेण्याची तीव्र इच्छा.
अशा वेळी जर पालकांनी त्यांचं कुतूहल दुर्लक्षित केलं, किंवा "मग विचारू नकोस असले प्रश्न!" असं म्हणत थांबवलं, तर मुलं हळूहळू स्वतःचे विचार बंद करू लागतात.
तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे की लहानपणी विचारले गेलेले प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरं, हेच त्यांच्या भविष्यातील विचारक्षमतेचे आणि निर्णयक्षमता विकसित होण्याचे आधार ठरतात.
जर पालक योग्य उत्तर देऊ शकत नसतील, तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगावं की "आपण हे एकत्र शोधून काढूया" किंवा "मी तुला याचं उत्तर लवकरच देतो"
मुलांनी विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, किंवा चुकीची माहिती दिली गेली, तर मुलं त्यांच्या शंका दूर करण्यासाठी बाहेरील, अनेकदा अविश्वसनीय आणि चुकीच्या स्त्रोतांकडे वळतात.
म्हणून पालकांनी मुलांच्या मनातील प्रश्नांवर संवेदनशील, खुले आणि समजूतदार पद्धतीने उत्तर द्यावं.