Akshata Chhatre
सध्या बाहेर बराच उकाडा वाढला आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांत जशी शरीराची काळजी घेणं महत्वाचं आहे तशीच झाडांची निगा राखणं सुद्धा महत्वाचं आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे झाडांना वेळोवेळी पाणी टाकत जा. एकतर सकाळी किंवा संध्याकाळी या झाडांना पाणी टाका, ज्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही.
गरमीच्या दिवसांत झाडांना सावली द्या, उन्हाची प्रखरता झाडांना सहन होत नाही, त्यांना यामुळे त्रास होऊ शकतो.
झाडांची माती कायम ओलसर राहील याची काळजी घ्या, याचा अर्थ तुम्हला झाडांना सतत भिजवून ठेवायचं असा नाही.
उन्हाळ्यात जास्तीत जास्त ऑरगॅनिक खताचा वापर करा. केमिकलच्या वापराने झाडांना आणखीन नुकसान होण्याची शक्यता असते.
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे झाडांना पुरेसा वारा मिळणं गरजेचं आहे, व्हेंटिलेशन व्यवस्थित होईल याची काळजी घ्या.