Manish Jadhav
प्रेमाची भावना फुलवणे ही एक कला आहे. केवळ नात्यात असणे पुरेसे नसते, तर ते नाते काळानुसार अधिक बहरणे महत्त्वाचे असते.
व्यस्त आयुष्यातून एकमेकांसाठी खास वेळ काढा. जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी मनापासून गप्पा मारा. एकत्र घालवलेले हे क्षण नात्यात गोडवा निर्माण करतात.
तुमचा जोडीदार तुमच्यासाठी ज्या छोट्या-छोट्या गोष्टी करतो, त्यांचे कौतुक करा. "आज तू खूप छान दिसत आहेस" किंवा "थँक्यू" सारखे शब्दही समोरच्या व्यक्तीला विशेष असल्याची जाणीव करुन देतात.
कोणतेही नाते विश्वासावर टिकून असते. एकमेकांशी प्रामाणिक राहा आणि कोणतीही गोष्ट लपवू नका. विश्वास जितका दृढ असेल, तितकी प्रेमाची भावना अधिक फुलत जाईल.
जोडीदाराच्या छंदांचा आणि आवडींचा आदर करा. कधीकधी त्यांच्या आवडीचे काम एकत्र मिळून करा. यामुळे तुम्ही केवळ जोडीदारच नाही, तर उत्तम मित्रही बनता.
प्रेमात नावीन्य टिकवण्यासाठी महागड्या भेटवस्तूंची गरज नसते. एखादे गुलाबाचे फूल, हाताने लिहिलेले छोटे पत्र किंवा त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवणे, अशा छोट्या गोष्टींनीही प्रेम वाढते.
केवळ आपलेच म्हणणे मांडण्यापेक्षा जोडीदाराचे विचार आणि समस्या शांतपणे ऐकून घ्या. त्यांना समजून घेतल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटते आणि भावनिक जवळीक वाढते.
संकटाच्या वेळी जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. "मी तुझ्यासोबत आहे" हा विश्वास प्रेमाची भावना अधिक प्रगल्भ करतो.
माणूस म्हटल्यावर चुका होतातच. छोट्या गोष्टींवरून चिडण्यापेक्षा एकमेकांना माफ करायला शिका. जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा भविष्यातील आनंदावर लक्ष केंद्रित करा.