लग्नानंतर जुने मित्र हरवू नयेत? नातं जपण्यासाठी 'या' 7 गोष्टी करा

Sameer Amunekar

वेळ काढा

व्यस्त दिनक्रमातसुद्धा जुने मित्र महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. महिन्यातून एकदा का होईना, त्यांना कॉल करा किंवा भेटीचा प्लॅन करा.

Friendship Tips | Dainik Gomantak

ओपन कम्युनिकेशन ठेवा

मित्र किंवा मैत्रिणीशी संवाद करताना आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक रहा. ओपननेसमुळे गैरसमज टळतात आणि नातेसुद्धा सुरक्षित राहतात.

Friendship Tips | Dainik Gomantak

ग्रुप गेट-टुगेदर

मित्र-मैत्रिणींसोबत त्यांच्या जोडीदारासहित एखादी गेटटुगेदर ठेवली, तर सगळ्यांनाच कम्फर्ट वाटतो आणि नातेसुद्धा घट्ट होतं.

Friendship Tips | Dainik Gomantak

सोशल मीडियाचा योग्य वापर करा

ग्रुप चॅट, स्टेटस रिप्लाय, लाईक्स याच्या माध्यमातून सातत्य ठेवा. यामुळे आपण दूर असूनही जवळ असल्यासारखं वाटतं.

Friendship Tips | Dainik Gomantak

मदत

मित्र संकटात असताना 'मी इथे आहे' एवढं सांगणंही नातं घट्ट करतं. ही छोटी गोष्ट खूप मोठं प्रभाव टाकते.

Friendship Tips | Dainik Gomantak

मैत्रीची सीमारेषा

लग्नानंतर काही सीमारेषा ओळखणे गरजेचे असते. कोणत्याही संवादात किंवा भेटीत आपण आणि आपले मित्र/मैत्रिण दोघंही कंफर्टेबल आहोत का, हे महत्त्वाचं आहे.

Friendship Tips

जोडीदारालाही त्या मैत्रीत सहभागी करा

आपले मित्र आपल्या जोडीदाराचेही मित्र बनले, तर वादाचं कारणच उरत नाही. त्यामुळे दोघांचेही मैत्रीवर्तुळ एकत्रित करणं फायद्याचं ठरतं.

Friendship Tips | Dainik Gomantak

ब्रेकअपचं दुःख झटकायचंय?

Relationship Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा