Sameer Amunekar
रागाच्या भरात भावना अनियंत्रित होतात आणि नकळत आवाज मोठा होतो. यामुळे संवादाऐवजी वाद वाढण्याची शक्यता असते.
राग आला की लगेच उत्तर देऊ नका. 10 सेकंदांचा छोटा विराम घेतल्याने विचार शांत होतात आणि शब्दांवर नियंत्रण राहते.
मोठ्याने बोलल्याने समोरची व्यक्ती बचावात्मक होते. हळू आणि शांत आवाजात बोलल्यास संवाद अधिक सकारात्मक होतो.
"तू नेहमी असं करतोस" म्हणण्याऐवजी "मला यामुळे वाईट वाटलं" असे म्हणा. त्यामुळे आरोप न करता भावना व्यक्त करता येतात.
राग वाढत असल्याचे जाणवल्यास 4-5 वेळा खोल श्वास घ्या. यामुळे मन शांत होण्यास मदत होते.
काही वेळा नातं जपणं हे वाद जिंकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं. समजून घेण्याचा प्रयत्न नात्यात विश्वास वाढवतो.
रागात चुकीचे शब्द बोलले असतील तर मनापासून माफी मागा. एक छोटा "सॉरी" नात्यातील दुरावा कमी करून विश्वास पुन्हा निर्माण करू शकतो.