Tarapur Fort: इतिहास तारापूर किल्ल्याचा; पोर्तुगीजांनी बांधला, शंभूराजांनी हादरवला अन् चिमाजी आप्पांनी भगवा फडकवला!

Sameer Amunekar

भौगोलिक स्थान 

पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे खाडी जिथे समुद्राला मिळते, त्या खाडीच्या मुखावर तारापूरचा किल्ला बांधलेला आहे.

Tarapur Fort | Dainik Gomantak

प्राचीन इतिहास 

बाराव्या शतकापासून तारापूर किल्ल्याचा उल्लेख आढळतो. इसवीसन १२८० मध्ये माहीमचा राजा भीम याने नाईकांकडून या किल्ल्याचा ताबा मिळवला.

Tarapur Fort | Dainik Gomantak

सत्तांतराचा इतिहास

पुढील काळात या किल्ल्यावर पोर्तुगीज, पेशवे व मराठे अशा विविध सत्तांचा अंमल राहिला.

Tarapur Fort | Dainik Gomantak

पोर्तुगीज काळ 

पोर्तुगीजांनी तारापूर किल्ला जिंकून घेतला व इसवीसन १५९३ मध्ये त्याची पुनर्बांधणी केली.

Tarapur Fort | Dainik Gomantak

छत्रपती संभाजीराजांचा हल्ला 

पोर्तुगीजांच्या आगळिकीमुळे संभाजीराजांनी दीव, दमण, सायवन, अशेरीगडासह तारापूरवर हल्ला केला. गाव बेचिराख झाले, मात्र किल्ला जिंकण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने तो सुरक्षित राहिला.

Tarapur Fort | Dainik Gomantak

मराठ्यांचा विजय 

२४ डिसेंबर १७३८ रोजी चिमाजी आप्पांनी जातीने हल्ला करून तारापूर किल्ला जिंकून घेतला.

Tarapur Fort | Dainik Gomantak

आजची स्थिती 

सध्या तारापूरमधील श्री. चोरगे यांच्या ताब्यात हा किल्ला असून त्यांनी किल्ल्याच्या परिसरात चिकू, आंबा, नारळ व सुपारीच्या बागा फुलवल्या आहेत.

Tarapur Fort | Dainik Gomantak

बॅसिलिस्क सरड्याबद्दलच्या 'या' 7 गोष्टी वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Basilisk Lizard | Dainik Gomantak
येथे क्लिक करा