Sameer Amunekar
जेवल्यानंतर लगेच वेगाने चालल्याने पचनावर ताण येतो, अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या वाढू शकते. किमान 10-15 मिनिटे थांबूनच चालायला सुरुवात करा.
जेवणानंतर खूप लांब चालल्यास पचनसंस्था थकते. त्याऐवजी फक्त 5-10 मिनिटे हळूहळू चालणे फायदेशीर असते.
पोटभर जेवणानंतर जास्त वेगात चालल्यास गॅस, फुगणे आणि डकार यासारख्या समस्या वाढतात. चालण्याची गती आरामशीर ठेवा.
जेवणानंतर जिने चढल्याने पोटावर ताण येतो, ज्यामुळे अॅसिडिटी किंवा पित्ताची समस्या होऊ शकते.
टाईट कपडे पोटाला दाब देतात आणि पचन प्रक्रियेत अडथळा आणतात. आरामदायक कपड्यांमध्येच चालणे योग्य.
चालताना सतत पाणी पिऊ नका. जेवणानंतर किमान 20-30 मिनिटे थांबूनच पाणी पिणे पचनासाठी चांगले असते.
चालताना वाकून मोबाईल पाहिल्यास पाठ आणि मानेवर ताण येतो.