Sameer Amunekar
रात्री झोपताना शरीर डिटॉक्स प्रक्रियेत असते. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने ही विषारी द्रव्ये लघवीद्वारे सहज बाहेर पडतात.
कोरड्या पोटी पाणी घेतल्याने पचनसंस्था सक्रीय होते, आणि बद्धकोष्ठतेची (कॉन्स्टिपेशन) समस्या कमी होते.
सकाळी पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि मुरुमे कमी होतात.
कोरड्या पोटी पाणी पिण्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे खाण्याची गरज कमी भासते. शिवाय मेटाबोलिज्म वाढतो, जो वजन कमी करण्यात मदत करतो.
मेंदूचे ७५% भाग पाण्याने बनलेला आहे. सकाळी उठल्यावर पाणी पिल्यानं मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो आणि ताजेपणा येतो.
नियमित सकाळी पाणी पिल्याने किडनी चांगली काम करते आणि युरिनरी इन्फेक्शनचा धोका कमी होतो.