Manish Jadhav
पावसाळ्यात हरिहर किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या खड्या पायऱ्यांवरुन ट्रेकिंग करणे म्हणजे अंगावर काटा आणणारा अत्यंत थरारक अनुभव ठरतो.
पावसाच्या दिवसांत संपूर्ण गड आणि पायऱ्या धुक्यात हरवून जातात, जिथून खाली पाहिल्यावर सह्याद्रीचे विलोभनीय रुप मनाला भुरळ घालते.
पावसाळ्यात ट्रेकच्या सुरुवातीपासूनच आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडी, छोटे धबधबे आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना ताजेतवाने करते.
सततच्या पावसाने कातळ निसरडा होत असल्याने येथे ट्रेकिंग करताना उत्तम ग्रीप असलेले बूट, रेनकोट आणि पूर्ण खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर कातळात कोरलेली थंडगार पाण्याची टाकी आणि तेथील श्री हनुमानाचे मंदिर पर्यटकांचा थकवा क्षणात घालवते.
पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून सुरु होणारा हा ट्रेक निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी पावसाळ्यात एक उत्तम पर्याय आहे.
पावसाळी पर्यटनासाठी येथे मोठी गर्दी होत असल्याने ट्रेकचा खरा आनंद घेण्यासाठी आणि गर्दीपासून वाचण्यासाठी भल्या पहाटे चढाई सुरु करणे सोयीचे ठरते.