Sameer Amunekar
गरम पाण्यामुळे टाळू कोरडी पडते, केस मुळापासून कमजोर होतात आणि केसगळती वाढते.
जास्त शॅम्पू केल्याने नैसर्गिक तेल निघून जाते, केस रुक्ष व निस्तेज होतात.
ओले केस खूप नाजूक असतात. जोरात विंचरल्यानं केस तुटतात आणि स्प्लिट एंड्स वाढतात.
कंडिशनर नेहमी केसांच्या टोकांवरच लावा; मुळांना लावल्यास टाळू तेलकट होते.
रगडल्यामुळे केस तुटतात. टॉवेलने हलक्या हाताने पाणी शोषून घ्या.
स्ट्रेटनर, कर्लर, ब्लो ड्रायर यांचा रोज वापर केल्यास केस कोरडे होतात .
तेलमालिश, डीप कंडिशनिंग आणि ट्रिमिंग न केल्यास केस लवकर खराब होतात.