गोमन्तक डिजिटल टीम
राज्यात काजू हे एक महत्त्वाचे पीक आहे. काजू पिकावर अनेक कुटुंबीयांचा संसार अवलंबून आहे.
सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हवामान बदलांचा परिणाम काजू उत्पादकांसमोर मोठे संकट बनून ठाकला आहे.
राज्यात आता काजूला मोहोर यायला सुरूवात झाली आहे.
सुरू असलेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढत असलेले तापमान यामुळे यंदाही काजू उत्पादक शेतकऱ्यांना पिकात घट होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
या काळात जर पाऊस पडला तर तो पिकांसाठी चांगलाच असतो. परंतु ढगाळ वातावरण, मोठ्या प्रमाणात वाढलेले तापमान घातक असते.
राज्यात ५७००१ हेक्टर क्षेत्रफळात काजू लागवड करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात राज्यात २४२४० टन इतके काजू उत्पादन घेण्यात आले.
गेल्या वर्षी सततच्या हवामान बदलांमुळे पिकात घट झाली होती. काजूला योग्य भाव देखील मिळाला नाही. गेल्या वर्षी फेणी, हुर्राक काढणाऱ्यांना बोंडू मिळणे कठीण झाले होते.