Sameer Amunekar
पावसाळ्यात आधीच माती ओलसर असते. अशावेळी अतिरिक्त पाणी दिल्यास मुळे कुजू लागतात.
सतत भिजलेल्या मातीत खत टाकल्यास पोषकद्रव्ये वाहून जातात आणि झाडांना फायदा होत नाही.
जास्त प्रमाणात रासायनिक खत वापरल्यास मुळे जळू शकतात आणि झाडे वाळू शकतात.
कुंडी किंवा बागेत पाणी साचल्यास मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.
मुसळधार पाऊस सुरू असताना खत टाकू नका. पाऊस थांबल्यानंतर किंवा हलक्या ओलाव्यात खत द्या.
कंपोस्ट, शेणखत किंवा वर्मीकंपोस्ट वापरल्यास झाडांना हळूहळू पोषण मिळते आणि मातीही सुपीक राहते.
आजारी किंवा कुजलेले भाग काढून टाकल्यास झाड निरोगी राहते आणि बुरशीचा संसर्ग कमी होतो.