Sameer Panditrao
गणेशोत्सवातील विसर्जनाला प्राचीन पुराणकथांचा आधार आहे. या परंपरेचा उगम महाभारत आणि स्कंद पुराणात सापडतो.
गणेश चतुर्थीच्या दिवशी महर्षी वेदव्यास महाभारताची कथा सांगू लागले, तर गणेशांनी ती लिहिण्यास सुरुवात केली.
भगवान गणेशांनी अखंड १० दिवस महाभारत लिहिले. सततच्या लेखनामुळे त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते.
गणेशांचा ताप कमी करण्यासाठी वेदव्यासांनी त्यांना जलात डुबकी घेण्यास सांगितले. याच घटनेतून विसर्जनाची परंपरा सुरू झाली.
स्कंद पुराणानुसार गणेशमूर्ती मातीपासून म्हणजेच पृथ्वी तत्त्वापासून बनवली जाते आणि विसर्जनानंतर जलात विलीन होते.
मानव जीवन पंचमहाभूतांपासून बनलेले असून शेवटी त्यातच विलीन होते. गणेश विसर्जन हा या सत्याचा प्रतीकात्मक संदेश देतो.
गणेश विसर्जन फक्त धार्मिक विधी नसून जीवन-मृत्यूच्या अनिवार सत्याची आणि निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण आहे.