Sameer Amunekar
प्रेम हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. पण जेव्हा एखादं नातं नवीन असतं, तेव्हा आपण भावना, उत्साह आणि अपेक्षांनी भारावून गेलेलो असतो. अशा वेळी काही चुका नकळत घडतात आणि त्या नात्याला तोडण्याइतपत गंभीर ठरू शकतात
प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधणं किंवा पार्टनरकडून सतत काही ना काही अपेक्षा ठेवणं हे नातं अशक्त करतं. अपेक्षा न पुऱ्या झाल्यास नातं कमकुवत होतं.
प्रेमात पडल्यावर अनेकजण स्वतःची आवडनिवड, मित्रमंडळी, छंद यांना बाजूला ठेवतात आणि फक्त पार्टनरभोवतीच फिरू लागतात. यामुळे नात्यात ‘दबाव’ वाढतो आणि ओळख हरवते.
‘तो/ती कुणाशी बोलतो/ते?’, ‘का वेळेवर रिप्लाय नाही दिला?’ अशा प्रश्नांनी प्रेमात असताना गुदमरायला होतं. हे नात्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतं.
एखादी गोष्ट लपवणं, खोटं बोलणं किंवा जबाबदारी टाळणं या गोष्टी नात्यावर दुष्परिणाम करतात. विश्वास एकदा गमावला, की नातं तुटायला वेळ लागत नाही.
पूर्वीच्या नात्यांचा किंवा चुका सतत चर्चेत आणणं हे वर्तमानातील नात्यावर परिणाम करतं. जुनं विसरून नव्या सुरुवातीला महत्त्व द्या.