Sameer Amunekar
समुद्रकिनाऱ्यावर दिसणारे शंख-शिंपले आकर्षक वाटतात, पण ते समुद्री परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग असतात. अनेक लहान जीव त्यात आश्रय घेतात. ते घरी नेल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो.
वाळू ही किनाऱ्याची नैसर्गिक ढाल आहे. ती मोठ्या प्रमाणात उचलल्यास किनाऱ्याची धूप वाढू शकते. काही ठिकाणी वाळू नेणे कायद्याने गुन्हा आहे.
प्रवाळ हे जिवंत सजीव आहेत. तुटलेले प्रवाळही परिसंस्थेसाठी महत्त्वाचे असते. ते घरी नेणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
किनाऱ्यावर साचलेली समुद्री वनस्पती दिसायला निरुपयोगी वाटली तरी ती अनेक जीवांसाठी अन्न व आश्रय देते.
लहान दगड-खडेही किनाऱ्याच्या रचनेचा भाग असतात. मोठ्या प्रमाणावर ते उचलल्यास नैसर्गिक संतुलन बिघडते.
खेकडे, स्टारफिश, लहान मासे यांना स्पर्श करणे किंवा घरी नेणे टाळा. ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच सुरक्षित असतात.
काहीजण मजेसाठी किंवा आठवण म्हणून वस्तू उचलतात, पण प्लास्टिक कचरा घरी नेण्याऐवजी योग्य कचरापेटीत टाका. शक्य असेल तर बीच स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा उचलून स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा.