Akshata Chhatre
केवळ चेहरा सुंदर असून उपयोग नाही. चाणक्यांच्या मते, सौंदर्यापेक्षा स्त्रीच्या बुद्धिमत्तेला आणि समंजसपणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.
ज्या स्त्रीची वाणी गोड नाही किंवा जिचा स्वभाव रागीट आहे, अशा स्त्रीसोबत संसार करणे कठीण जाते. खराब वागणूक नात्यात कायमची दरी निर्माण करू शकते.
खोटेपणा हा नात्याचा पाया पोखरणारा कीड आहे. चाणक्य म्हणतात की, वारंवार खोटे बोलणारी व्यक्ती कुटुंबात कधीही विश्वासार्हता निर्माण करू शकत नाही.
लग्नापूर्वी जोडीदाराच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती असणे आवश्यक आहे. ज्या घरात नेहमी कलह असतात, त्या वातावरणातील प्रभावामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात.
ज्या स्त्रीचे चारित्र्य संशयास्पद आहे किंवा स्वभाव चंचल आहे, ती कधीही स्थिर संसार करू शकत नाही. अशा नात्यामुळे पतीच्या सन्मानाला धक्का लागू शकतो.
जुन्या काळात घरकाम येणे ही महत्त्वाची अट होती. आजच्या काळात याचा अर्थ 'जबाबदारीची जाणीव' असा होतो. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती असणे अत्यंत गरजेचे आहे.
थोडक्यात सांगायचे तर, क्षणिक आकर्षणापेक्षा दीर्घकालीन सुख महत्त्वाचे आहे. चांगला स्वभाव आणि संस्कार असलेली स्त्रीच घराला स्वर्ग बनवू शकते.