Manish Jadhav
टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला.
या मालिकेत यशस्वी जैस्वालने शतकी खेळीने लक्ष वेधले, पण यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने खास विक्रमाची नोंद केली.
वेस्ट इंडीजवरील विजयानंतर ध्रुव जुरेल कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सलग सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय खेळाडू ठरला.
जुरेलने भारतासाठी सलग 7 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला. यापूर्वी, हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता, ज्याने सलग 6 कसोटी सामने जिंकले होते.
जुरेलने केलेली ही कामगिरी महेंद्र सिंह धोनी आणि ऋषभ पंत यांनाही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सलग 7 सामन्यांत करता आली नव्हती.
ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत ध्रुव जुरेलला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली होती आणि त्याने ती सिद्ध केली.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जुरेलने पहिल्या डावात 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर दुसऱ्या डावात नाबाद 6 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला.
त्याने आतापर्यंत खेळलेल्या 7 कसोटी सामन्यांमध्ये 47.77 च्या सरासरीने 430 धावा केल्या असून यात 1 शतक आणि 1 अर्धशतक समाविष्ट आहे.