Sameer Amunekar
धामापूर तलाव हा मानवनिर्मित असून त्याची निर्मिती साधारणपणे इ.स. १५३० मध्ये विजयनगरच्या काळात झाली आहे. हा तलाव पर्यटनासोबतच ऐतिहासिक वारसा जपून आहे.
२०२० मध्ये या तलावाला जागतिक स्तरावर 'वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर' म्हणून मान्यता मिळाली. असा मान मिळवणारा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा तलाव आहे.
तलावाच्या चहूबाजूंनी माड, पोफळी आणि आंब्याची घनदाट झाडी आहे. यामुळे येथील वातावरण अत्यंत शांत आणि थंड असते, जे पर्यटकांना मनाला भुरळ घालते.
तलावाच्या काठावर देवी भगवतीचे प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते.
येथे विविध प्रकारचे पक्षी, जलचर आणि दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
पर्यटकांना तलावाचा आनंद घेता यावा यासाठी येथे बोटींगची (नौकाविहार) सोय उपलब्ध आहे. शांत पाण्यात बोटिंग करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
धामापूर तलाव हा पूर्णपणे प्रदूषणमुक्त असून त्याचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. निसर्गाच्या सान्निध्यात 'इको-टुरिझम'चा अनुभव घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.