Manish Jadhav
देवगड किल्ला हा मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र होता. 1705 मध्ये कान्होजी आग्रेंनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याची डागडुजी केली आणि तो अधिक भक्कम केला.
किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या तटबंदीवरुन संपूर्ण देवगड बंदर आणि अथांग अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून एका बाजूला देवगड खाडी आहे. किल्ल्याचा आकार काहीसा त्रिकोणी असून तो एका टेकडीवर वसलेला आहे.
देवगड किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथले 'लाईट हाऊस'. हे दीपगृह आजही जहाजांना दिशा दाखवण्याचे काम करते आणि पर्यकांसाठी ते मुख्य आकर्षण आहे.
किल्ल्याच्या आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा आणि पाण्याचे टाके पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना आजही थक्क करणारी आहे.
किल्ल्याच्या परिसरात एक प्राचीन गणेश मंदिर आहे. स्थानिक लोक आणि येणारे पर्यटक या मंदिरात आवर्जून दर्शन घेतात.
देवगड किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारा सूर्यास्त हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. आकाश तांबूस रंगाने न्हाऊन निघते तेव्हा किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते.
देवगड शहर हे रेल्वे (कणकवली स्थानक) आणि रस्त्याने जोडलेले आहे. किल्ल्याजवळच सुप्रसिद्ध देवगड बीच आणि खाडी असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.