Akshata Chhatre
काच ही केमिकल्स फ्री असते. यात पाणी, ज्यूस किंवा चहा ठेवल्यास त्याची चव बदलत नाही आणि ती कोणत्याही द्रवाशी प्रक्रिया करत नाही.
तांब्यातील पाणी पचन सुधारते, मेटाबॉलिज्म वाढवते आणि शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते.
काचेच्या बाटल्या वजनाने जड असतात आणि फुटण्याची भीती असते. प्रवासासाठी तांब्याची बाटली अधिक टिकाऊ ठरते.
तांब्याची बाटली हवा आणि ओलाव्यामुळे काळी पडू शकते. ती लिंबू किंवा पित्तबंरीने नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे.
तांब्याच्या बाटलीत कधीही लिंबू पाणी किंवा आंबट पदार्थ ठेवू नका, यामुळे विषबाधा होण्याचा धोका असतो.
सकाळी रिकाम्या पोटी पिण्यासाठी तांब्याची बाटली उत्तम आहे, तर ऑफिस किंवा जिमसाठी काचेची बाटली स्वच्छ आणि सुरक्षित आहे.
रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी साठवा आणि सकाळी ते प्या. उरलेल्या दिवसासाठी काच किंवा स्टीलच्या बाटलीचा वापर करणे सर्वात प्रॅक्टिकल आहे.