गोमन्तक डिजिटल टीम
२५ डिसेंबर रोजी घडलेल्या बोट दुर्घटनेनंतर कळंगुट समुद्रकिनाऱ्यांवर जलसफर व जलक्रीडाचे प्रकार बंद होते.
समुद्रातील अशा जलसफरीविषयी किती वयोमर्यादेतील मुलांना बोटमध्ये चढण्यास परवानगी देण्याबाबत कुठलेच निकष किंवा स्पष्ट नियमावली नाही.
ओव्हरलोड करून प्रवासी बोटीवर कोंबणे हे समुद्रकिनाऱ्यांवरील जलसफरीतील प्रकार नित्याचेच आहेत आणि एखादी दुर्घटना घडल्यानंतरच हे विषय प्रकर्षाने समोर येतात.
आता जलसफर करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास, संबंधितांना थेट अटकच करावी. त्याचप्रमाणे बोटीचा वाहतूक परवाना निलंबित करावा, अशी सूचना बंदर कप्तान अधिकाऱ्यांना केली आहे.
बोटमालकांच्या दाव्यानुसार बोटवर सर्वांकडे लाईफ जॅकेट होते. बोटीचे इंजिन वाळूत रुतून बंद पडले. समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. या बाबीवरही विचार व्हावा.
समुद्रकिनाऱ्यावर किनारी पोलिस कर्मचारी असतात; परंतु क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटमध्ये भरून जलसफर घडवत असल्यास याला आक्षेप घेतला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
पर्यटकांना लाईफ जॅकेट घालणे अनिवार्य केले जाते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय किंवा पर्यटन विभाग तिथे उपलब्ध नसतात, ही वस्तुस्थिती आहे.