बा.. वेताळा, गाव उद्ध्वस्त होण्यापासून वाचव!

गोमन्तक डिजिटल टीम

गाऱ्हाणे

" बा वेताळा, एके काळी चोपडे गाव तू वसवलास. आज या गावावर परप्रांतीयांची नजर गेलेली आहे " असे गाऱ्हाणे चोपडे ग्रामस्थांनी देवाला घातले.

वेताळ देव

ग्रामस्थांनी दर्यासम्राट वेताळ देवाला गाऱ्हाणे घालण्यामागे कारण काय आहे ते आपणास माहित आहे का?

घरांचा प्रकल्प

केवळ २०० लोकसंख्या असलेल्या डोंगर माथ्यावर २००ते ४०० घरांचा प्रकल्प होऊ घातला आहे. त्यामुळे चोपडे गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

सांडपाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

डोंगर माथ्यावर असलेल्या या प्रकल्पच्या अस्तित्वमुळे चोपडे गावावर सांडपाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित राहणार आहे.

अति संवेदनशील

पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असताना या डोंगर उतरणीवरील जमिनीचे रूपांतरण कसे काय झाले असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

वन्यप्राणी

चोपडे डोंगरमाथ्यावर बिबट्यांचा संचार आहे. काही दिवसांमागे वन खात्याच्या पिंजऱ्यात बिबटा अडकला होता. आणखी वन्यप्राणीही या डोंगरावर आढळतात.

बांधकाम

या ठिकाणी बांधकामांसोबत मोठ्या प्रमाणात कुपनलिका खोदण्यात आल्या असल्याने सरकारने याचा विचार करावा अशी मागणी होत आहे.

धोक्याची घंटा

ही स्थानिकांसाठी धोक्याची घंटा आहे, आमचे अस्तित्व संपुष्टात येण्यास उशीर लागणार नाही असेही नागरिकांचे मत आहे.

लढा देण्याच्या तयारीत

बेकायदा जमीन रूपांतर मागे न घेतल्यास स्थानिक न्यायालयात जाण्याची तसेच एकत्रित लढा देण्याच्या तयारीत आहेत.

आणखी पाहा