Manish Jadhav
राजस्थानातील चित्तोडगड हा किल्ला केवळ एक वास्तू नसून भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचे जिवंत प्रतीक आहे. हा किल्ला सुमारे 700 एकर परिसरात पसरलेला असून याला 'किल्ल्यांचा सिरमोर' (किल्ल्यांचा राजा) म्हटले जाते. डोंगरावर वसलेला हा अवाढव्य किल्ला लांबून एखाद्या मोठ्या जहाजासारखा दिसतो.
महाराणा कुंभा यांनी माळवा आणि गुजरातच्या सुलतानांवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ हा 122 फूट उंच स्तंभ उभारला होता. यावर हिंदू देवी-देवतांचे अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
अल्लाउद्दीन खिलजीने किल्ल्याला वेढा घातला तेव्हा आपला आत्मसन्मान राखण्यासाठी राणी पद्मिनी यांनी 16000 राजपूत महिलांसह अग्नीमध्ये उडी घेऊन 'जौहर' (आत्मबलिदान) केला होता. ही जागा आजही पर्यटकांच्या अंगावर शहारे आणते.
याच किल्ल्यात प्रसिद्ध कृष्णभक्त संत मीराबाईंचे मंदिर आहे. मीराबाईंनी आपला राजवाडा सोडून याच मंदिरात बसून श्रीकृष्णाची अनेक भजने रचली होती.
चित्तोडगड हा डोंगरदरीत असूनही येथे पाण्याचे मोठे नियोजन होते. एकेकाळी येथे 84 तलाव आणि विहिरी होत्या, ज्यामुळे 50,000 सैनिकांना 4 वर्षे पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असायचा. आजही येथे 'गौमुख कुंड' प्रसिद्ध आहे.
किल्ल्यात जाण्यासाठी राम पोल, लक्ष्मण पोल आणि हनुमान पोल यांसारखे 7 विशाल दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाचा स्वतःचा इतिहास आणि युद्धाच्या कथा आहेत.
हा किल्ला मेवाड राजघराण्याची राजधानी होता. मुघल सम्राट अकबरासोबत झालेला संघर्ष आणि महाराणा प्रताप यांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा या किल्ल्याच्या मातीशी जोडलेला आहे.