Manish Jadhav
चित्रदुर्ग किल्ल्याला 'कल्लीना कोटे' म्हणजेच दगडांचा किल्ला म्हटले जाते. हा भारतामधील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक असून, तो ग्रॅनाइटच्या अवाढव्य खडकांचा वापर करुन अत्यंत कल्पकतेने बांधला गेला.
या किल्ल्याची रचना 'एळुसुत्तू कोटे' म्हणजेच सात वर्तुळाकार तटबंदींमध्ये विभागलेली आहे. शत्रूला मुख्य भागात पोहोचणे अशक्य व्हावे, अशा प्रकारे याच्या चक्रव्यूहासारख्या भिंती आणि गुप्त मार्ग तयार करण्यात आले होते.
किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात थरारक भाग म्हणजे 'ओनाके ओबव्वा' हिचे शौर्य! हैदर अलीचे सैनिक एका अरुंद गुप्त खिंडीतून (किंडी) किल्ल्यात घुसत असताना, ओबव्वाने एकटीने मुसळाने प्रहार करुन अनेक शत्रू सैनिकांना कंठस्नान घातले होते.
38 गुप्त दरवाजे
किल्ल्यात 38 गुप्त दरवाजे, 4 मुख्य दरवाजे आणि पाण्याच्या साठवणुकीसाठी अनेक विहिरी व तलाव आहेत. पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये आणि वेढा पडल्यास वर्षानुवर्षे पाणी पुरावे, असे अद्भूत रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञान येथे पाहायला मिळते.
विजयनगर साम्राज्यानंतर चित्रदुर्गवर 'पालयेगार' म्हणजेच मदकरी नायक घराण्याचे राज्य होते. या घराण्यातील 'राजा वीर मदकरी नायक' हे अत्यंत शूर राजे होते, ज्यांनी हैदर अलीच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध निकराचा लढा दिला.
या किल्ल्याला महाभारताचाही संदर्भ आहे. असे मानले जाते की, याच परिसरातील टेकड्यांवर भीम आणि हिडिंबासूर यांच्यात युद्ध झाले होते. किल्ल्याच्या आवारात असलेले प्राचीन हिडिंबेश्वर मंदिर याची साक्ष देते.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार सरळ रेषेत नसून नागमोडी वळणांचे आहे. शत्रूच्या हत्तींना वेगाने येऊन दरवाजावर धडक देता येऊ नये, म्हणून ही हुशार रणनीती वापरण्यात आली होती.