Manish Jadhav
कर्नाटकातील चित्रदुर्ग किल्ला हा त्याच्या 'एळु सुत्तुल कोटे' म्हणजेच सात पदरी भिंतींच्या संरक्षणासाठी जगप्रसिद्ध आहे. या रचनेमुळे शत्रूला किल्ल्यात शिरणे अशक्य होते.
हा किल्ला पूर्णपणे नैसर्गिक खडकांचा वापर करुन बांधलेला आहे. याला 'कल्लिन कोटे' (दगडांचा किल्ला) असेही म्हणतात, कारण येथील भव्य दगड आजही पर्यटकांना थक्क करतात.
14 व्या ते 18व्या शतकापर्यंत या किल्ल्यावर नायक (Palegar) घराण्याचे राज्य होते. मदकरी नायक हे या घराण्यातील सर्वात प्रभावशाली शासक मानले जातात.
जेव्हा हैदर अलीच्या सैन्याने एका अरुंद छिद्रातून गुपचूप शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ओनके ओबव्वा नावाच्या शूर महिलेने केवळ मुसळाने शेकडो शत्रूंना यमसदनी धाडले होते.
1779 मध्ये अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर हैदर अलीने हा किल्ला जिंकला. त्यानंतर टिपू सुलतानने येथे अनेक नवीन बांधकामे आणि मशिदी उभारल्या.
किल्ल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष भासू नये म्हणून नायक राजांनी दगडांमध्ये अनेक तलाव आणि विहिरी खोदल्या होत्या, ज्या आजही भरलेल्या दिसतात.
पौराणिक कथेनुसार, भीम आणि हिडिंबा राक्षसाचे युद्ध याच परिसरात झाले होते. किल्ल्यावर आजही प्राचीन एकनाथेश्वरी मंदिर आणि अनेक हिंदू-मुस्लिम वास्तुशिल्पे पाहायला मिळतात.
या विशाल किल्ल्याला एकूण 38 प्रवेशद्वारे आहेत. शत्रूचा गोंधळ उडवण्यासाठी अनेक गुप्त मार्ग आणि भूलभुलैयासारखी रचना करण्यात आली होती.