Sameer Panditrao
राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यात झाला.
आई जिजाऊंनी राजनीती, युद्धकलेचे शिक्षण घेतले होते. काळाच्या पुढचा विचार त्यांनी त्यावेळच्या अवघड परिस्थिती केला होता.
शहाजी महाराजांच्या कार्यात त्यांच्या पाठीशी जिजाऊमाता खंबीरपणे उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना निर्भिडपणे त्यांनी प्रत्येक गोष्टीला तोंड दिले.
तत्कालीन परिस्थितीमुळे जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.
जिजाऊमातेनं कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा, मावळ्यांचा विचार केला. त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांवर, मावळ्यांवर मुलाप्रमाणे प्रेम केले, त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.
राजमाता जिजाऊंनी शिवरायांना रयतेची परिस्थिती जवळून दाखवली त्यामुळे आत्मविश्वास, दूरदृष्टी, न्याय, राज्यकारभार यात आदर्श असे स्वराज्य उदयाला आले.
छ.संभाजीराजेंना बालपणी महत्वाचे मार्गदर्शन मिळाले ते आई जिजाऊंचे. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.
शिवाजी महाराज आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील कुणाला जिंकता आली यामागचे कारण म्हणजे राजमाता जिजाऊ.