Manish Jadhav
कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला 'विशालगड' हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता.
या किल्ल्याचे मूळ नाव 'खेळणा' होते. 1659 मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला आणि याचे नाव बदलून 'विशालगड' (महारष्ट्रातील विशाल दुर्ग) असे ठेवले.
जुलै 1660 मध्ये सिद्धी जोहरच्या पन्हाळगडच्या वेढ्यातून निसटल्यानंतर महाराज याच विशालगडाकडे मदतीसाठी निघाले होते.
महाराज विशालगडावर सुरक्षित पोहोचेपर्यंत खिंड लढवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांनी घेतली. त्यांच्या शौर्याने 'घोडखिंड' ही 'पावनखिंड' बनली.
बाजीप्रभूंनी महाराजांना शब्द दिला होता की जोपर्यंत गडावरुन तोफांचे आवाज येत नाहीत, तोपर्यंत ते खिंड लढवतील. तोफांचा आवाज ऐकूनच त्यांनी आपले प्राण सोडले.
विशालगडालाही शत्रूचा वेढा होताच, पण महाराजांनी तो वेढा मोडून काढला आणि गडावर सुरक्षित पोहोचून तोफा डागल्या.
विशालगडावर पोहोचल्यावर महाराजांना बाजीप्रभूंच्या बलिदानाची माहिती मिळाली. त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या या एकनिष्ठ मावळ्याला श्रद्धांजली वाहिली.
विशालगड हा केवळ एक किल्ला नसून तो शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचा आणि मावळ्यांच्या पराक्रमाचा जिवंत इतिहास आहे, जो आजही लाखो शिवप्रेमींना प्रेरणा देतो.