Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहीमा राबवल्या. यापैकीच एक सुरतची मोहीम होती. महाराजांनी तीन वेळा सुरतेची लूट केली.
महाराजांनी सुरतची पहिली लूट 1664 मध्ये केली. या मोहीमेत त्यांनी सुरत शहरावर हल्ला करुन तिथून संपत्ती लुटली होती.
दरम्यान, या लुटीचे मुख्य कारण मोगल सरदार शाहिस्तेखानाने पुण्यावर केलेल्या हल्ल्यामुळे मराठा साम्राज्याची आर्थिक स्थिती खालावली होती, ज्याची भरपाई करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.
सुरत हे मोगलांचे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते. महाराजांनी याच व्यापारी केंद्रावर हल्ला करुन लुटले.
महाराजांनी सुरत सुमारे तीन दिवस लुटले. या लुटीतून मिळालेल्या संपत्तीचा उपयोग मराठा साम्राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि स्वराज्याच्या कार्यासाठी करण्यात आला होता.
महाराजांनी सुरत शहरावर हल्ला करण्याची योजना गुप्त ठेवली होती.
महाराजांनी आपले गुप्तहेर बहिर्जी नाईक यांना सुरत शहराची माहिती काढण्यासाठी पाठवले होते.
बहिर्जी नाईक यांनी सुरत शहराची संपूर्ण माहिती शिवाजी महाराजांना दिली, ज्यामुळे त्यांना सुरत शहरावर हल्ला करण्याची योजना यशस्वीपणे पार पाडता आली.