Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक आणि बुद्धिमत्तेचा कस पाहणारी घटना म्हणजे 1666 साली झालेली त्यांची आग्र्याहून सुटका.
जयसिंगाच्या मध्यस्थीने आणि दिलेल्या वचनानुसार महाराज 1666 मध्ये पुत्र संभाजीराजांसह आग्र्याला पोहोचले.
मात्र औरंगजेबाच्या दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या रांगेत उभे करुन अपमानित करण्यात आले. यामुळे चिडलेले महाराज लगेच दरबारातून बाहेर पडले.
महाराजांच्या या कृतीमुळे औरंगजेबही चिडला. त्याने महाराजांना जयसिंगाच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवले आणि त्यांच्याभोवती कडक पाहरा लावला.
महाराजांनी औरंगजेबाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी आजारी पडल्याचे नाटक केले आणि प्रकृती सुधारण्यासाठी दानधर्म करण्याची इच्छा व्यक्त केली.
सुरुवातीला सुरक्षा रक्षक या पेट्यांची तपासणी करत होते, पण काही दिवसांनी त्यांना याची सवय झाली आणि त्यांनी तपासणी करणे बंद केले. हीच महाराजांनी संधी साधली.
17 ऑगस्ट 1666 रोजी महाराज आणि संभाजीराजे दोन वेगवेगळ्या मिठाईच्या पेट्यांमध्ये बसून किल्ल्याबाहेर पडले. ही सुटका इतकी धाडसी होती की मुघल सैनिकांना थांगपत्ताही लागला नाही.
किल्ल्याबाहेर पडल्यावर महाराजांनी साधूचा वेश धारण केला आणि संभाजी महाराजांना मथुरा येथे एका विश्वासू ब्राह्मणाच्या घरी ठेवले. तिथून त्यांनी वेगाने दक्षिणेकडे प्रवास सुरु केला.
सुमारे 25 दिवसांच्या प्रवासानंतर महाराज स्वराज्यात सुखरुप परतले.
आग्र्याहून सुटकेच्या या पराक्रमाने शिवाजी महाराजांचे धैर्य, चातुर्य आणि दूरदृष्टी सिद्ध झाली. यामुळे मराठा साम्राज्याची कीर्ती सर्वदूर पसरली आणि स्वराज्याच्या निर्मितीला आणखी बळ मिळाले.