Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी मराठा आरमाराची ताकद ओळखली. त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली एक मोठे आणि आधुनिक आरमार उभे केले.
सिद्धीच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी संभाजी महाराजांनी आपल्या ताब्यातील सर्व सागरी किल्ले (उदा. पद्मदुर्ग, खांदेरी) अधिक मजबूत केले आणि तिथे शस्त्रसामग्रीचा साठा वाढवला.
सिद्धीचा किल्ला समुद्रात असल्यामुळे त्याला जमिनीवरुन हरवणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी जंजिऱ्याला वेढा घालण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली.
जंजिऱ्याच्या सिद्धीला नामोहरम करण्यासाठी त्यांनी जंजिऱ्यासमोरच पद्मदुर्ग नावाचा एक मजबूत जलदुर्ग उभारला. हा किल्ला मराठा आरमाराचा तळ बनला.
संभाजी महाराजांनी मोठे भूदळ आणि आरमार घेऊन जंजिऱ्याला वेढा घातला. त्यांनी किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला आणि मराठा सैनिक गलबतांतून किल्ल्यावर हल्ला करु लागले.
समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे वेढा पूर्ण करणे अवघड जात होते. त्यावेळी महाराजांनी खाडीतून किल्ल्यापर्यंत लाकडी फळ्यांचा एक सेतू (पूल) उभारण्याचा धाडसी प्रयत्न केला.
मराठ्यांनी वेढा मजबूत केल्यामुळे सिद्धी कासिम हतबल झाला. त्याने तात्काळ मुघल बादशहा औरंगजेबाकडे मदतीची याचना केली.
मुघलांनी मराठा साम्राज्याच्या दुसऱ्या भागात हल्ला सुरु केला. त्यामुळे, दोन्ही शत्रूंशी एकाच वेळी लढण्याऐवजी संभाजी महाराजांनी रणनीतीचा भाग म्हणून जंजिऱ्याचा वेढा तात्पुरता उठवला. मात्र, त्यांच्या या पराक्रमाने सिद्धीची ताकद कमी झाली आणि तो भविष्यात मराठा साम्राज्याला मोठा धोका निर्माण करु शकला नाही.