गोव्यातील बागायतदारांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू! कारण जाणून घ्या..

Sameer Panditrao

थंडीचा परिणाम

आता थंडी पुन्हा चांगल्या प्रकारे पडू लागली आहे. बागायती, काजू, व आंब्याच्या उत्पादनासाठी ही थंडी पोषक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Goa's weather and its effect on agriculture

काजू उत्पादन

मागील काही वर्षांपासून काजू पिकामध्ये सातत्याने घट होत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती.

Goa's weather and its effect on agriculture

आशादायक मोहोर

चांगल्या पावसामुळे आणि पोषक वातावरणामुळे काजू तसेच आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर आला आहे. बागायतदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Goa's weather and its effect on agriculture

हवामानबदलाचा परिणाम

सतत हवामान बदल आणि तापमानातील फरकामुळे आंबा व काजू पिकांच्या मोहोरावर परिणाम होतो. उष्णतेमुळे टी मॉस्किटो व मॅंगो हॅपर कीड पसरते, ज्यामुळे मोहोर काळवंडतो.

Goa's weather and its effect on agriculture

दव

जर मोहोरावर मोठ्या प्रमाणात दव राहिले तर त्याचा पिकावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Goa's weather and its effect on agriculture

हवामान अंदाज

गोवा वेधशाळेनुसार, पुढील ४८ तासांत तापमान कमाल ३३°C आणि किमान २१°C राहण्याची शक्यता आहे. रात्री व पहाटे धुके आणि दव पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Goa's weather and its effect on agriculture

नागरिकांसाठी सूचना

उष्णता आणि थंडी यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे.

Goa's weather and its effect on agriculture
गोव्यातील हा 'पक्षी महोत्सव' चुकवू नका