गोव्यात काजू, आंब्याला चांगला मोहर; तरीही बागायतदारांना का सतावतेय चिंता? वाचा..

Sameer Panditrao

काजू उत्पादनात घट

मागील चार वर्षांपासून राज्यातील काजू उत्पादनात सातत्यानं घट होत आहे. परंतु यंदा वातावरणाने बागायतदारांची आशा वाढली आहे.

Cashews | Dainik Gomantak

पोषक वातावरण

यंदा चांगला पाऊस, थंडी आणि पोषक वातावरणामुळे काजू आणि आंब्यांच्या झाडांमध्ये चांगला मोहर आहे. यामुळे बागायतदारांना आशा आहे की, पिकं चांगली येतील.

Cashew Crops | Dainik Gomantak

हवामान बदलांची चिंता

काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होत आहे. उष्मा आणि धुके यामुळे काजू आणि आंबा पिकाचा मोहर करपण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Weather Effect On Cashew And Mango Crops | Dainik Gomantak

पिकांवर परिणाम

सतत हवामान बदल घडल्यास आणि तापमानात १५ अंश सेल्सिअसचा फरक पडल्यास काजू आणि आंबा पिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Sun | Dainik Gomantak

किडीचा धोका

तापमान वाढल्यास काजूसाठी टी मॉस्किटो आणि मॅंगो हॅपर कीडीचा प्रादुर्भाव होतो.

Mango Crops | Dainik Gomantak

काळजी घेण्याची गरज

बागायतदारांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण योग्य काळजी न घेतल्यास काजू आणि आंबा पिक खराब होऊ शकते.

Mangos | Dainik Gomantak

आशा आणि चिंता

बागायतदारांना आशा आहे की वातावरण पोषक राहिलं तर दोन्ही पिकं चांगली येऊन त्यांना चांगले पैसे मिळतील. त्याच वेळी उष्मा, धुके आणि दव यामुळे चिंता देखील आहे.

Farmer | Dainik Gomantak
Crowd on Beach | Dainik Gomantak
गोव्यात पर्यटकांचे जोरदार सेलिब्रेशन; पाहा Photos