दैनिक गोमन्तक डिजिटल
अनेक जण रात्रभर किंवा २-३ दिवस केसात तेल तसंच ठेवतात. यामुळे टाळूवर (scalp) धूळ आणि घाण जमा होते, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात.
जास्त तेल लावल्याने केस जास्त सुंदर होत नाहीत. उलट, ते तेल धुण्यासाठी जास्त शॅम्पू वापरावा लागतो, ज्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.
तेल लावताना हाताची नखे लागतील असे किंवा खूप जोरात चोळून मसाज करू नका. यामुळे केसांची मुळे सैल होतात आणि केस तुटण्याचे प्रमाण वाढते. नेहमी हलक्या हाताने मसाज करावा.
तेल लावल्यानंतर केसांची मुळे खूप नाजूक आणि मऊ झालेली असतात. अशा वेळी लगेच कंगवा फिरवल्यास केस मोठ्या प्रमाणात तुटतात. तेल लावण्यापूर्वीच केस विंचरून घ्यावेत.
कोमट तेल केसांसाठी उत्तम असते, पण जर तेल जास्त गरम करून लावले, तर त्यामुळे टाळूची त्वचा भाजू शकते आणि केसांचे कायमचे नुकसान होऊ शकते.
जर केसांमध्ये आधीच धूळ, घाम किंवा कोंडा असेल आणि त्यावरच तुम्ही तेल लावले, तर केसांची छिद्रे (pores) बंद होतात. यामुळे खाज सुटणे आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
तेल लावल्यानंतर लगेच केसांना घट्ट वेणी घालणे किंवा अंबाडा बांधणे टाळावे. तेल लावल्यामुळे आधीच संवेदनशील झालेली केसांची मुळे घट्ट बांधल्याने लगेच तुटतात.
अनेक जण तेल फक्त टाळूला (स्कॅल्प) लावतात आणि केसांच्या टोकांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे केस दुभंगणे (split ends) आणि कोरडे पडण्याची समस्या निर्माण होते. म्हणून मुळांपासून टोकांपर्यंत तेल लावावे.