Manish Jadhav
कडू कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारल्याचा ज्यूस तर मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरतो.
मधुमेह रुग्ण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कारल्याचा रस पितात.
दररोज कारल्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास आणि चयापचय वाढण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे त्यांच्यासाठी कारल्याचा रस पिणे फायदेशीर ठरु शकते.
कारल्याच्या रसात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन सुधारण्यासाठी गरजेचे ठरते.
कारल्यामध्ये असलेले पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.