Manish Jadhav
बिदर किल्ला हा प्रामुख्याने बहामनी साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. 1427 मध्ये सुलतान अहमद शाह वली याने गुलबर्गा येथून आपली राजधानी बिदरला हलवली आणि या भव्य किल्ल्याची पुनर्बांधणी केली.
हा किल्ला त्याच्या 10 किलोमीटर लांब आणि अवाढव्य तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. या तटबंदीत 37 मोठे बुरुज आहेत. विशेष म्हणजे, शत्रूपासून संरक्षणासाठी किल्ल्याभोवती तिहेरी खंदक खोदले आहेत, जे भारतात दुर्मिळ मानले जातात.
किल्ल्याच्या आत इंडो-इस्लामिक आणि पर्शियन वास्तुकलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. येथील 'रंगीन महाल' आपल्या रंगीत टाइल्स आणि लाकडी कोरीव कामासाठी जगप्रसिद्ध आहे.
बिदर किल्ल्याच्या परिसरात असलेली मोहम्मद गावान मदरसा ही तत्कालीन काळातील एक मोठी युनिव्हर्सिटी होती. 15व्या शतकातील या इमारतीची भव्यता आणि त्यावरील निळ्या रंगाचे नक्षीकाम आजही पर्यटकांना थक्क करते.
किल्ल्यामध्ये 'सोळा खंभा मशीद' आहे, जी 16 मोठ्या खांबांवर उभी आहे. ही मशीद बहामनी काळातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानली जाते. याला 'झनानी मशीद' असेही म्हटले जाते.
बिदर किल्ल्याची पाणीपुरवठा यंत्रणा अत्यंत प्रगत होती. 'कारेंझ' या पर्शियन तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीखालून पाणी किल्ल्यात आणले जात असे, ज्यामुळे दुष्काळातही किल्ल्यावर पाण्याची कमतरता भासत नसे.
बिदर किल्ल्यावर केवळ बहामनीच नव्हे, तर बरीद शाही, मुघल आणि मराठा साम्राज्याचाही प्रभाव राहिला आहे. औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यापूर्वी येथे अनेक भीषण युद्धे झाली होती, ज्याची साक्ष येथील अजस्त्र तोफा आजही देतात.