Manish Jadhav
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात सरिस्का अभयारण्याजवळ असलेला भानगड किल्ला हा 16व्या शतकात, म्हणजेच इसवी सन 1573 मध्ये आमेरचे राजे भगवंत दास यांनी आपल्या धाकट्या मुलासाठी, माधव सिंह यांच्यासाठी बांधला होता.
आज हा किल्ला भग्नावस्थेत असला तरी इतिहासकाळात तो अत्यंत भव्य होता. किल्ल्याच्या आत मुख्य राजमहाल, बाजारपेठा, नर्तकींची हवेली आणि गोपीनाथ, सोमेश्वर व मंगला देवी यांची अप्रतिम शिल्पकला असलेली मंदिरे आहेत.
इतिहासानुसार, हा किल्ला बांधण्यापूर्वी माधव सिंह यांनी तिथे राहणारे तपस्वी 'बाबा बालू नाथ' यांची परवानगी घेतली होती. त्यांनी अट घातली होती की, "महालाची सावली माझ्या कुटीवर पडू नये, अन्यथा संपूर्ण शहर उद्ध्वस्त होईल."
लोककथांनुसार, भानगडची राजकुमारी रत्नावती अत्यंत रुपवान होती. 'सिंघिया' नावाच्या एका तांत्रिकाने तिला वश करण्यासाठी काळ्या जादूचा वापर केला. परंतु, राजकुमारीला त्याचा कट समजला आणि त्या तांत्रिकाचा एका मोठ्या दगडाखाली चिरडून मृत्यू झाला.
काही इतिहासकारांच्या मते, शाप किंवा भुताखेतांपेक्षा भानगड ओसाड होण्याचे मुख्य कारण युद्ध आणि दुष्काळ हे होते. 1720 च्या दशकात आमेरचे राजे सवाई जयसिंह यांनी भानगडवर आक्रमण करुन ते आपल्या राज्यात जोडले आणि 18व्या शतकातील एका मोठ्या दुष्काळानंतर येथील उरलेली लोकसंख्याही तिथून निघून गेली.
भानगड किल्ला हा डोंगराच्या कुशीत अत्यंत विचारपूर्वक बांधला गेला होता. शत्रूपासून बचावासाठी या किल्ल्याला पाच मुख्य दरवाजे होते आणि आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी डोंगराच्या दिशेने गुप्त भुयारी मार्ग तयार करण्यात आले होते.
इतिहासातील धक्कादायक पडझड आणि स्थानिक रहस्यांमुळे भारतीय पुरातत्व विभागाने या किल्ल्याला 'अधिकृतपणे' भारतातील सर्वात रहस्यमयी जागा घोषित केले. रात्रीच्या वेळी इथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी या किल्ल्यात प्रवेश करण्यास कायद्याने सक्त मनाई आहे.