Sameer Amunekar
पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथील भुशी डॅम, राजमाची पॉईंट आणि धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ पाडते.
जून महिन्यात येथील स्ट्रॉबेरीचे शेत आणि विल्सन पॉईंटवरून दिसणारा निसर्ग अधिकच खुलतो. हलका पाऊस आणि थंड हवामान मनाला ताजेतवाने करते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे आंबोली धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील हिरवेगार डोंगर आणि धुकं मनाला भुरळ पाडतात.
निसर्गप्रेमींसाठी हे एक नंदनवन आहे. जून महिन्यात येथील 'काजवा महोत्सव' (Fireflies Festival) आणि विल्सन डॅमचा परिसर पाहण्यासारखा असतो.
वाहनांना बंदी असलेले हे आशियातील एकमेव प्रदूषणमुक्त हिल स्टेशन आहे. पावसाच्या सुरुवातीला येथील टॉय ट्रेनचा प्रवास आणि डोंगरकपाऱ्यांमधील शांतता अनुभवण्यासारखी असते.
विदर्भाचे काश्मीर मानले जाणारे चिखलदरा जून महिन्यात हिरवेगार होते. येथील कॉफीचे मळे, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य अप्रतिम दिसते.
धबधबे, किल्ले आणि नयनरम्य घाटांसाठी इगतपुरी प्रसिद्ध आहे. पहिल्या पावसात येथील विपश्यना केंद्र आणि कसारा घाटाचे सौंदर्य दुप्पट होते.