Sameer Amunekar
पाऊस सुरू झाला की निसर्ग पुन्हा एकदा बहरतो. हिरवेगार डोंगर, धबधबे आणि धुके अनुभवण्यासाठी भारतातील 'ही' 5 ठिकाणे सर्वोत्तम आहेत.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही ठिकाणे पावसाळ्यात अक्षरशः ढगांच्या सावलीत लपतात. इथले धबधबे आणि हिरवेगार घाट पाहणे म्हणजे एक मेजवानीच असते.
चहाच्या मळ्यांनी नटलेला मुन्नार पावसाळ्यात हिरवागार शालू पांघरल्यासारखा दिसतो. धुक्यात हरवलेले डोंगर आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करते.
जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक! इथले 'लिव्हिंग रूट ब्रिजेस' आणि कोसळणारे भव्य धबधबे पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.
'भारताचे स्कॉटलंड' म्हणून ओळखले जाणारे कूर्ग पावसाळ्यात अधिकच खुलते. कॉफीचे मळे आणि इथल्या दाट जंगलांमधील भटकंती निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे.
पावसाळ्यात उदयपूरचे रूप पूर्णपणे बदलते. सरोवरांचे शहर असलेल्या या ठिकाणचे सौंदर्य पावसाच्या सरींमध्ये अधिकच वाढते, जे पर्यटकांना भुरळ घालते.
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, तर यंदाच्या पावसाळ्यात यापैकी एका ठिकाणाला नक्की भेट द्या. या ठिकाणांचे सौंदर्य पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल!