Akshata Chhatre
सध्या सगळीकडेच गरमी वाढली आहे आणि आंब्यांचा हंगाम देखील सुरु झालाय. गरमीचा महिना आणि आंबा म्हटलं की कैरीचं पन्हं आलंच.
पण गरमीपासून आराम ही एवढीच पन्ह्याची खासियत आहे? नाही पन्ह हे भरपूर गुणकारी आहे. कसं जाणून घ्या?
पन्ह्यात व्हिटॅमिन-सी नावाचा घटक असतो, जो तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी महत्वाचा आहे.
पन्ह्यात इलेक्ट्रॉलचा घटक देखील असल्याने यामुळे शरिराला हायड्रेटेड राहायला मदत मिळते.
पन्ह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि परिणामी ऍसिडिटीसारखे त्रास होत नाहीत.
पन्ह्यामुळे एनर्जी बूस्ट होते, गर्मीचा त्रास सहन करावा लागत नाही आणि शरीराला फायदा होतो.
पन्ह्यामुळे वजन आटोक्यात राहायला मदत मिळते, साखरेचं प्रमाण सुद्धा मोजणीत राहतं.