Manish Jadhav
इ.स. 1665 मध्ये मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने पुरंदर किल्ल्याला भयंकर वेढा घातला होता. मराठ्यांच्या इतिहासातील ही सर्वात घनघोर लढाई ठरली.
पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी केवळ 700 मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांवर हल्ला चढवला. त्यांच्या तुफानी तलवारीच्या माऱ्याने मुघल सैन्यात मोठी घबराट पसरली होती.
मुघलांनी पहिल्यांदा पुरंदरच्या पाठीशी असलेल्या 'वज्रगड' या उपकिल्ल्यावर तोफांचा भडीमार करुन ताबा मिळवला. वज्रगड हातात गेल्यावर मुघलांनी थेट पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर तोफांचा रोख लावला.
छातीठोकपणे लढणाऱ्या मुरारबाजींचे शौर्य पाहून खुद्द दिलेरखान थक्क झाला आणि त्याने मुरारबाजींना मुघल सैन्यात येण्याची ऑफर दिली. पण स्वराज्याशी निष्ठा राखत मुरारबाजींनी ती ऑफर धुडकावून लावली आणि लढत राहिले.
दिलेरखानाने कपटाने चालवलेला तीर मुरारबाजींच्या कंठात बसला आणि हा पराक्रमी वीर धारातीर्थी पडला. मावळा पडला तरी मराठ्यांनी हार न मानत बालेकिल्ल्याचा बचाव सुरुच ठेवला.
मावळ्यांचा जीव आणि स्वराज्याचे होत असलेले अतोनात नुकसान रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाचा मार्ग निवडला. यातूनच ऐतिहासिक 'पुरंदरचा तह' झाला, ज्यामध्ये महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले.
पुरंदरची लढाई ही केवळ जय-पराजयाची नसून ती मावळ्यांच्या असीम स्वामीनिष्ठा आणि बलिदानाची अमर गाथा आहे. मावळ्यांच्या याच बलिदानातून पुढे हिंदवी स्वराज्याची गुढी पुन्हा समर्थपणे उभारली गेली.