Sameer Amunekar
उन्हाळ्यात घाम आणि उष्णतेमुळे शरीर गरम असते. अचानक अतिथंड पाण्याने आंघोळ केल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्याने आंघोळ करावी.
उन्हाळ्यात घाम येत असल्याने अनेक लोक दिवसातून २-३ वेळा आंघोळ करतात. पण यामुळे त्वचेला आवश्यक असलेले नैसर्गिक तेल (नॅचरल ऑईल) कमी होऊन कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे दिवसातून एक किंवा फारतर दोन वेळा आंघोळ करावी.
गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी होते आणि अन्नद्रव्ये नष्ट होतात. त्यामुळे शक्यतो कोमट किंवा थोडेसे थंडसर पाणी वापरणे योग्य.
उन्हाळ्यातही त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे गरजेचे असते. हलकं आणि नॉन-स्टिकी मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेला पोषण मिळते आणि कोरडेपणा दूर होतो.
रात्री झोपण्याच्या अगोदर लगेच आंघोळ केल्यास शरीराचे तापमान झपाट्याने बदलते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. झोपण्याच्या किमान १ तास आधी आंघोळ करणे अधिक फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात आंघोळ करताना योग्य पद्धतीने आंघोळ करणे गरजेचे आहे.