Sameer Panditrao
देशातील चिखलाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणमीमांसा करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) अंदमान आणि निकोबारमधील बारातांग बेटावर पथक पाठवणार.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हा ज्वालामुखी निद्रिस्त होता.
प्रतल हालचालींमुळे २ ऑक्टोबर रोजी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
या उद्रेकाबाबत अधिक संशोधन करण्यासाठी कोलकताहून जीएसआयच्या सात भूगर्भशास्त्रज्ञांचे पथक बारातांगला रवाना होईल
पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट् एकमेकांवर आदळून एक प्लेट दुसऱ्याच्या खाली जाते.
अंदमान आणि निकोबार बेटे या या प्लेटची वारंवार हालचाल होणाऱ्या अधोगमन क्षेत्रात येतात. त्यामुळे या बेटांना अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवतात.
त्याचप्रमाणे बॅरेन बेटांवरील ज्वालामुखीच्या उद्रेकामागेही हे कारण असू शकते.
20 वर्षांनी झाला जागा भारतातील एकमेव 'ज्वालामुखी'