Akshata Chhatre
आजच्या तणावग्रस्त आणि गतिशील जीवनशैलीत अनेकांना अचानक एका अशा आजाराचा सामना करावा लागतो, जो दिसायला साधा वाटतो पण शरीराला हळूहळू पोखरत राहतो. तो म्हणजे डायबिटीज.
या आजारात शरीरातील साखरेचं प्रमाण अनियंत्रितपणे वाढतं, जे हृदय, किडनी, डोळे अशा महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू लागतं.
अनेकजण फक्त गोळ्यांवर अवलंबून राहतात, पण आयुर्वेदात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास मार्गदर्शक तत्वं सांगितली आहेत. महर्षी चरकांनी आपल्या संहितांमध्ये सांगितलेले काही उपाय आजही अत्यंत उपयुक्त ठरतात.
योग्य आहार, दिनचर्या, नैसर्गिक औषधी आणि आयुर्वेदिक उपचार यामुळे डायबिटीजवर नियंत्रण ठेवणं शक्य आहे.
गहू, ज्वारी, हरभरा, मूग, कारले, जांभूळ आणि कडूनिंबाची पानं या पदार्थांचा वापर अधिक करावा. हे पदार्थ पचनक्रिया सुधारतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.