Sameer Amunekar
रोहा या छोट्या शहरातून कुंडलिका नदीचा पूल ओलांडल्यावर अवचितगडाकडे जाता येते. हा किल्ला रोहापासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे.
इ.स. 9वे ते 10वे शतक या काळात शिलाहार राजांनी या किल्ल्याची बांधणी केल्याचे अवशेषांवरून दिसून येते.
काही काळ हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि बाजी पासलकर यांच्या देखरेखीखाली त्याची पुनर्बांधणी केली.
किल्ल्याच्या एका बुरुजावर शके 1718 (इ.स. 1795-96) सालाचा उल्लेख असलेला शिलालेख आहे, ज्यावरून त्या काळातही किल्ल्याची दुरुस्ती झाल्याचे दिसते.
शिवरायांनी या किल्ल्याची बांधणी घाईघाईत केल्यामुळे त्याला ‘अवचितगड’ (अवचित म्हणजे अचानक तयार झालेला गड) असे नाव दिले. या कामात शेख महंमद यांनी शिवरायांना सहकार्य केले होते.
इ.स. 1818 मध्ये कर्नल प्रॉथरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी सूरगड, भोरपगड जिंकून लगेच अवचितगडही ताब्यात घेतला. मराठ्यांची सत्ता संपुष्टात आल्याने किल्ला पुन्हा परत मिळवण्याचा प्रश्नच आला नाही.