गोमन्तक डिजिटल टीम
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव करत विजय मिळवला आहे.
भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 181 धावांवर गारद झाला.
भारताने दुसऱ्या डावात 157 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं.
भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकाही गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये साऊथ अफ्रिकेने आधीच स्थान पक्कं केलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा टीम इंडिया फायनल खेळणार नाही.