Manish Jadhav
आयसीसीने 2024 मधील मेन्स टी-20 आय क्रिकेटरचे नाव जाहीर केले आहे. या पुरस्कारासाठी 4 खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती.
यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा धाकड ट्रॅव्हिस हेड आणि झिम्बाब्वेचा सिंकर रझा यांचा समावेश होता.
दरम्यान, या सगळ्यांना पछाडत अर्शदीपने हा पुरस्कार जिंकला. सध्या इंग्लडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अर्शदीपचा जलवा पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी त्याने टीम इंडियासाठी 18 टी-20 सामने खेळले, ज्यामध्ये 36 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये अर्शदीप भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
गेल्या काही वर्षांत अर्शदीप टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वात घातक गोलंदाज बनला आहे.
अर्शदीपने नोव्हेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने अवघ्या दोन वर्षात टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला.
त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी टी-20 मध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या तुलनेत, कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतक्या विकेट घेता आल्या नाहीत. यापूर्वी हा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता.